समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार (दुःखाचे मूळ)- Samarth Ramdas Suvichar Marathi

शेअर करा:

समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार (दुःखाचे मूळ)-

  1. शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांना पढतमूर्ख म्हणतात. जो विज्ञान आहे व लोकास ब्रहमज्ञान सांगतो. पण जो वासना आणि प्रयत्नाने अवगुण बाळगतो तोही पठढतमूर्खच श्रोत्यांनी प्रयत्नाने अवगुण सोडता येतात नंतर माणूस सुखी होतो
  1. जो स्वधर्माची निंदा करतो, सर्वांना नावे ठेवतो शब्दाने मन दुखवतो, घमेंडी असतो, क्रोधी असतो तोच पढतमुर्ख होय परंतु प्रयत्नाने ते अवगुण सोडावे.
  1. परमार्थ न साधता संसारात गुंतून राहतो, स्त्रीयामध्ये राहतो. विनाकरण स्तुती करतो. मत्सर करतो, तो पठत मुर्ख होय हे अवगुण प्रयत्नाने जावू शकतात.
  1. ज्यास वैराग्य नाही, भजन पूजन नाही. तीर्थ क्षेत्र वेद आणि शास्त्र मानीत नाही. पाठीमागे तो निंदा करतो तो पठतमुर्ख होय. प्रयत्नाने हे अवगुण जातात.
  1. जो सद्गुरुषा विसरतो, प्रपंचासाठी परमार्थ वारतो सद्गुदुची किंमत ठेवत नाही, स्वार्थी व कुंजूष असतो तो पठतमर्ख समजावा प्रयत्क्नाने हे दोष जातात
  1. जीव पूर्वी जन्माचीकर्मे भोगासाठी जन्म घेतो,असे वेद म्हणतो, कर्म भोगण्यासाठी शरीर लागते. जन्म म्हणजे कुविद्या, अज्ञान वासना होय.
  1. जन्म म्हणजे स्वरुपापासून बाहेर काढणारी अवस्था होय. मी देह आहे ही सुक्ष्म कल्पना जीवाला जन्‌म घालते. अविधेमुळे, वासनेमुळे जन्म येतो.
  1. गंगेचे पाणी प्याले तर त्याचे मूत्र बनते, मळ, मूत्र आणि ओक यावरच देह जगतो.वाढतो
  1. गर्भात असता मूळ “सोह सोह” अशी आत्मबुध्दि असते बाहेर येताच “कोहे कोहं”अशी देहबुध्दी होते.
  1. द्रश्यरुप सृष्टि, दुःखाचे मुळ आहे. जन्म घेण्यापासून शेवटपर्यंत दु:खच असते.भोगावयाचे असते
  1. ब्रह्मदिक देव अथवा प्रत्यक्ष लक्ष्मीला देखील सख्या आईप्रमाणे मुलाची समजुत काढता येत नसे.
  1. आई कुरुप असो, गरीब असो आईपाशीच मुलाचे सर्व सुख केंद्रित असते.
  1. वय वाढत जात असता नैसर्गिक शारीरिक आपत्ती येतात रोग होतात, विविध तापाने माणसास त्रास होतो
  1. लोक बायकोसाठी भक्ति सोडतात, सामुज्यमुक्ति स्त्रीपुढे तुच्छ मानतात व परमार्थ बुडवितात.
  1. पहिल्री बायको वारल्यानंतर दुसरे लग्न केले तर आणखी दु:ख वाढते. गरीबी वाढते, भक्ति विसरतो व देवाला खोटे मानू लागतो.
  1. देह क्षीण झाला, नाना रोग उद्भवतात, तारुण्य संपले वर दु:ख वाढत जाते, मुले झाले नाहीत, झाली, पण मरुन गेली. दु:खहि दुःख झाले.
  1. मुल होण्यासाठी मंत्रतंत्र केले, चेटकीचे प्रयोग केले, वेडा झाला दुःखहि दुःख झाले. पाप कर्मे केली
  1. घरखर्च वाढतो. मिळकत कमी होते. कर्जबाजारी होतो. कर्जबाजारी होतो. आपण अन्न खातोतेच आपणास खाते, अंगीलागत नाही.
  2. प्रपंचात सर्व आपले सुख पाहतात, दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव ठेवत नाहीतशेवटी कोणीच उपयोगी पडत नाही.
  1. प्रपंचातील सर्व नाते केवळ सुखासाठीच असतात. आई सोडून. शरीरास जिने जन्म दिला ती आई मात्र मिळणार नाही.
  1. आई डाकिणी जरी असली तिची मुलावर माया असते, हजार बायका केल्यातरी अशी माया मिळणार नाही, जी प्रांपचिक माणसे आई बापाशी भक्ति भावाने वागतात ती धन्य होत.
  1. आपला देह दुसर्‍याचा ताबदोर केला ईश्‍्वरासाठी त्याचा वापर केला नाही. केवळ एका कामवासनेसाठीच जन्मभर कष्ट केले आणि आयुष्याच्या शेवटी एकटयासच जावे लागते.
  1. तारूण्य गेले, बळ गेले, संसार करण्याची हौस गेली. शरीर, संपत्ति नाश पावली ज्याना वाढविले तेच शत्रू होतात. परंतु शेवटी कठीण प्रसंग येतो
  1. जन्मभर स्वार्थच मागे लागला पण सर्व व्यर्थ गेले. सुखासाठी श्रम केले परंतु अखेरीस दु:ख यातना आणि मरणानंतर यम यातना सोसाव्या लागणार.
  1. जन्म सर्व दुःखाचे मुळ आहे. प्राणी जन्मला की दु:ख सुरु होते. माणसाने स्वत:चे कल्याण करुन घ्यावे. प्रत्येकाने भगवंतास शरण यावे.
  1. म्हातरपण येते अंत:काळी जीवास पश्‍चाताप होतो. पुन्हा जन्म मरण व संसार यातना येतात, भगवंताच्या भक्ति शिवाय यातून सुटका नाही.
  1. .देह, इंद्रिये व प्राण यांच्यामुळे सुख दु:ख होतात तो आध्यात्मिक ताप असे नांव आहे उदा. सर्व प्रकारचे रोग, थंडी, उकाडा, भूक, झोप अति संभोग
  1. बाह्य पदार्थाच्या संयोगाने जे सुखदु:ख निर्माण होते. त्यास आधि भौतिक ताप म्हणतात. उदा. ठेंच लागणे, मुंगी, डांस चावणे
  1. कुरुप, क्रुर स्वभावाची बायको मिळणे, मुलगा मुर्ख असणे, बाहय कारणाने यातना होणे, छळ करणे यास आधिभौतिक ताप म्हणतात.
  1. माणसांना त्याच्या चांगल्या वाईट कर्मानी मरणानंतर स्वर्गनरक असे अनेक भोग भोगावे लागतात. त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात अविचाराने जो अनेक दोष करतो त्यामुळे त्यास यमयातना भोगावे लागतात.
  1. मरणोत्तर लोकांत पापपुण्याची शरीरें असतात. मनुष्य मेल्यावर त्याचा सुक्ष्म देह त्याच्या पापपुण्यानुसार त्या शरीरात जातो मग त्याला पापाची पुण्याची फळे भोगावी लागतात.
  1. जे वेदाजा पाळीत नाहीत, हरिभक्ति करीत नाहीत त्याना यमयातना भोगाव्या लागतात.
  1. जन्माला आल्यापासून काळ सारखा बरोबर असतो जसे ज्याचे कर्म असते तसे माणूस स्वदेशी अथवा परदेशी देह ठेवतो. बलाढय महाराजे सुध्दा मृत्यूपुढे टिकत नाहीत.
  1. हटयोगी, राजयोगी, विरक्‍त, बाल, तरूण, शहाणा, पुण्य पुरुष हरिदास, सत्कर्म करणारा सर्वांना मृत्यू ओळखत नाही.
  1. माणूस अति थोर, प्रत्यक्ष विष्णु आणि शंकर असोत किंवा भगवंताचा अवतार असले तरी मृत्यू त्याची पर्वा करत नाही.
  1. हा मृत्यूलोक आहे ही जाणीव ठेवून माणसाने आपले सार्थक करुन घ्यावे. मृत्युने देह नेला तरी किर्ती रुपाने स्वत: लोकामध्ये उरावे.
  1. ब्राहमण गेले, संसारी गेले, असे सारे गेले पण संत मात्र टिकले. परंतु आत्मज्ञानी होऊन जे स्वस्वरुपाशी एकरुप झाले तेवढे मात्र ठिकते.
  1. मृत्यूचा नेम नाही. आशा व ममता सूक्ष्म देहाच्या बेडया आहेत या देहास जखडून ठेवतात, दु:ख देतात, संकटात टाकतात.
  1. देहाभिमानाची वृत्ती, कामवासना, तिरस्कार वृत्ती जात नाही. मद, मत्सर कमी होत नाहीत. तोपर्यंत मनुष्य मोहीत अवस्थेतअसतो.
  1. बुडत असताना माणूस माझे माझे म्हणत राहतो आयुष्य वाया जात असून कुळाचा अभिमान, प्रपंचाचे माझेपण सोडीत नाही.
  1. जे आविकपणाने भगवंतास शरण जातात, त्यांना स्वानंद भोगावयास मिळतो. संसार दुःख बाधत नाही. त्यांना भगवंताची मदत खात्रिने मिळते इतर लोक दु:खात मरतात.
  1. यज्ञ म्हणजे सेवा, पूजा करणे, ज्याला देव मनापासून आवडतो त्याच्या संकटाचे ओझे देवावर पडते भगवंत दासाचे संसारदुःख नाहीसे करतो.
  1. .ज्याची आराधना तसेच त्याला देव समाधान देतो, भाव किंचीत जरी उणा झाला,मंद झाला तर देव लगेच दुरावतो, त्याची प्रचिती मंदावते.
  1. ईश्‍वर दर्शनार्ने पावन झालेले पुरुष आपण स्वत: तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात, तारतात. ते अभक्त भक्‍त होतात.
  1. मानवी जीवन हे रत्नांनी भरलेली पेटी आहे असे समजावे त्या पेटीत ईश्‍वर भजनाची उत्तम रत्ने भगवंतास अर्पावी आणि आनंद लुटावा.
  1. जो ईश्वराचा पक्का आधार थरुन संसाराची वासना सोडतो त्यांना देव आंत बाहेर संभाळतो, त्याची वृत्ती प्रपंच संभाळतो.
  1. ज्याचा जीव अत्यंत आत्मीयतेने ईश्‍वरामध्ये गुंतलेला असतो ते भक्‍त स्वानंदाचा सोहळा लुटतात, त्याच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो पण तो सामान्य व्यवहारामध्ये दृश्य नसतो.
  1. एकास मोठे रत्न मिळाले त्याने ते न जाणता कवडी मोलाने घलविले, तसे आत्मघातकी अभाविक माणूस कवडी मोलाने जीवन घालवितो, तसे ईश्वर न जोडणारे करंटे आहेत
  1. पूर्वकर्माच्या क्रणानुबंधाने प्रपंचातील माणसे एके ठिकाणी गोळा होतात, जन्माला येतात, आपले शरीरसुध्दा खरे नाही. एका भगवंतावाचूर खरोखर आपले कोणी नाही. भआावबळाने त्याला घट्ट धरा.
  1. आत्मरुपातील श्री राम सोडून जे देह सुखाची वासना करतात ते दुरात्मा समजा, ते आपल्या कर्माची फळे भोगतात. –
  1. आंतबाहेर आनंदन भरलेला राम सोडून जो नित्य इंद्रिय सुखाची इच्छा करतो, त्यास कधीही समाधान मिळणार नाही. त्यासाठी भगवंताचे भजनी लागावे. खरे सुख मिळेल, दुःखाचे मूळ असलेले सगळे स्वजन दूर करा.
  1. ज्याची देहसुखाची वासना विसरली तो खरा सुखी होय. एकनिष्ठेने भगवंताचे भजन करणाऱ्यास आपोआप सुख लाभेल.

समर्थ रामदास स्वामी ह्यांचे मराठी सुविचार हे  लेखक :श्री .मारुति रामचंद्र सोनार ह्यांच्या सहत्र विचार समर्थांचे ह्या पुस्तकातील आहेत .

ई- साहित्य प्रतिष्ठान कडून पूर्व संमतीने  हा लेख ह्या ब्लॉग वर प्रकाशित.

पुस्तकांची पर्वणी अश्या  esahity ह्या संकेतस्थळा भेट देवून मराठीभाषेला समृद्धा करण्यात आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यात सर्वांनी आपला वाटा उचलावा.


check at amazon

Leave a Comment